Total Pageviews

Saturday 11 March 2017

होळी


होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.

होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.

“होळी रे होळी पुरणाची पोळी” ..
किंवा 
“होळीला गवऱ्या पाच पाच….. डोक्यावर नाच नाच”…


लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”“शिमगा”“हुताशनी महोत्सव”“दोलायात्रा”“कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत

Saturday 4 October 2014

विजयादसमी

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी

किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या

घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला

केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि

दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात

येतो.

महाराष्ट्रात हा सण दसरा म्हणूनही साजरा केला

जातो. परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची

पाने देतात.या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन

अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते.

सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून

जायचे,शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे,तेथे

अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची

स्थापना करावयाची तीला प्रार्थना करावयाची

कि मला विजयी कर.त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र

पूजन,व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व

विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी

प्रथा आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे या दिवशी

साधारणतः श्रवण नक्षत्र राहते.

* पौराणिक दाखले

१. श्रीरामाने या दिवशी रावणाचा वध केला.

२. पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले.

Tuesday 30 September 2014

नवरात्र !!! हा उत्सव का साजरा करतात ?

महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री

दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र !!!

नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह

अनेक ठिकाणी

हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या

व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची

मनोभावे आराधना केली जाते. आज अनेक

राज्यांत याला उत्सवाचे स्वरूपही आले आहे.

रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या

उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत

करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर

रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार

मारले.


महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते

नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला

रात्री महिषासुराला ठार मारले. तेव्हापासून तिला

महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

दुर्गा देवीची आरती

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके

शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते !!

दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारी अनाथनाथे अंबे

करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणांतें वारी

हारी पडलो आता संकट निवारी॥१॥

जय देवी

जय देवी जय महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरदे

तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥

त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही चारी

श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता

पडले प्रवाही ते तू भक्तांलागी पावसि

लवलाही॥२॥

जय देवी जय देवी जय

महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी,

जय देवी जय देवी ॥धृ॥

प्रसन्नवदने प्रसन्न होशी निजदासा

क्लेशापासुन सोडी तोडी भवपाशा

अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा नरहरि तल्लिन

झाला पदपंकजलेशा॥३॥

जय देवी जय देवी जय

महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी,

जय देवी जय देवी ॥धृ॥

Sunday 17 August 2014

दहीहंडी

दहीहंडी :-

गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी ठिकठिकाणी

उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने

उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने

मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची

एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात.

अलीकडे ‘दहिहंडी’ हा एक `आंतरराष्ट्रीय

इव्हेंट' बनला आहे. मानवी मनोरा करणारे, हंडी

फोडणारे ‘गोविंदा’ यांची फार चढाओढ सुरू झाली

आहे. तरुणांची संघटित शक्ती ही या उत्सवाची

प्रमुख जमेची बाजू आहे. मुंबई हे या उत्सवाचे

मोठे, प्रमुख केंद्र आहे. श्रीकृष्ण म्हणजे

खट्याळ, खोडकर, दही-दूध- लोणी चोरून

खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न- पिढ्या

सांगितली जाते. अनेक गाणी- गोष्टी त्याच्या या

लीलांवरच रचलेल्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या

सवंगड्यांसह, मनोरे करून दही- दूध-लोण्याच्या

हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अशा

श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही

कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून

प्रत्येकाच्या मनात तयार होते. तरुणांनी

चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली

काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी

अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते.......

गोकुळाष्टमी

श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण

जन्माचा उत्सव करून हा सण साजरा

करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री

श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन

उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात.

Saturday 9 August 2014

राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा : श्रावण पौर्णिमा याच दिवशी हा सण साजरा केला जातो. बहिणीने भावाला उजव्या हाताला रेशमी गोफ हे प्रेमाचे प्रतीक बांधून, नाते पक्के करण्याची ही पद्धत आहे. भावाच्या हाताला राखी बांधून, बहीण आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाकडे सोपवते, नात्याचा बंध अधिक दृढ करते. ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही, ते ही नाती प्रेमाने निर्माण करतात. मानवी नात्यांच्या माध्यमातून अशा विशिष्ट दिवशी एकत्र येणे, आनंदाचा अनुभव घेणे या निमित्ताने घडते.