Total Pageviews

Wednesday 30 July 2014

का करतात श्रावण महिन्यात महादेवाची पुजा ?

का करतात श्रावण महिन्यात महादेवाची पूजा? देवांचा देव म्हणजे महादेव. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले आहे. या संबंधातील एका गोष्टीनुसार जेव्हा सनत राजकुमारांनी महादेवाला विचारले की, श्रावण महिना आपल्याला का प्रिय आहे तेंव्हा महादेव म्हणाले की देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

श्रावण महिना

श्रावण : हिंदू कालगणनेनुसार हा पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्र असते म्हणून या महिन्याचे नाव श्रावण पडले आहे. या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. या महिन्यात हिंदूंची वतवैकल्ये व सण सर्वाधिक असल्याने चातुर्मासातील या महिन्याला सर्वांत जास्त धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असते. सोमवारी शिवपूजा व अर्धा उपवास करतात; तसेच नववधू तांदूळ, तीळ, मूग, जवस व सातू या धान्यांची शिवामूठ सोमवारी शिवाला वाहतात. मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करुन हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. बुधवारी बुधाची तर गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुकवारी गौरीची पूजा करतात, सवाष्णीला भोजन देतात व त्याचप्रमाणे सुवासिनींना दूध-फुटाणे देऊन हळद-कुंकू लावतात. शनिवारी शनी, मारुती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. रविवारी सूर्याची पूजा ( आदित्यपूजन ) करुन त्याला खिरीचा नैवद्य दाखवितात. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. उदा., शुद्घ पंचमीला नागपंचमी म्हणतात. त्या दिवशी नागाची पूजा करुन त्याला दूध देतात. पौर्णिमेला समुद्रकिनारी वरुणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरुन नारळी पौर्णिमा हे नाव आले आहे; तर या दिवशी बहीण भावाला राखी बांधते म्हणून या दिवसाला रक्षाबंधन वा राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी सुताची पोवती पण हातात बांधण्याची प्रथा असल्याने पोवती पौर्णिमा हेही नाव या दिवसाला आहे. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असल्यास उपाकर्म करुन पुरुष नवीन यज्ञोपवीत ( जानवे ) धारण करतात. या विधीला श्रावणी म्हणतात.

Saturday 19 July 2014

GATARI AMAVASYA

July 26,2014 Saturday...'Gatari Amavasya' in Maharashtra. This day marks the beginning of Shravan Maas(Shravan mahina) , the fifth month in the Hindu calender.Shravan Maas is full of religious festivals and almost every day of this month is auspicious, especially mondays ( called shravani somvar in marathi ). Shiv Aradhana is done on mondays. Why the month is called shravan? Because the star called shravan rules the sky during this month. Why to avoid non-vegetarian food during month? The reason is that it's the monsoon season and many animals are pregnant during this period, so we are not supposed to kill and eat the animals for this entire month. As an early compensation for the month-long abstinence that is about to follow, people get together and hog wholeheartedly on their favorite non-veg food and booze. This celebration is called gatari. Happy Gatari..

Wednesday 16 July 2014

CHANDOLI { ता.शिराळा-सांगली }

चांदोली धरण परिसर ,अभयारण्य ,जि. सांगली चांदोली धरण सांगली जिल्ह्यात असले तरी पाण्याचा फुगवटा हा सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात येतो. चांदोली अभयारण्य 309 चौ.कि.मी. परिसरात आहे. यात अनेक वनौषधी आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेले अशिया खंडातील क्रमांक दोनचे मातीचे धरण म्हणून चांदोली धरणाचे नाव चटकन डोळ्या पुढे येते.सुमारे 34 टी एम.सी.पाणीसाठा असलेले व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या तोंडाशी असलेले हे धरण निर्मिती पासूनच चर्चेत राहिले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पाथरपुंज येथे वारणा नदी उगम पावली आहे.शिराळा तालुक्याच्या हद्दीत अभयारण्यात असलेल्या प्रचीतगडाच्या पायथ्याशी राम नदीचा उगम आहे. या दोन नद्या धरणाच्या पाणीसाठयाचे मुख्य स्त्रोत आहेत. चांदोली गावाच्या हद्दीवर असल्याने चांदोली,तर वारणा नदीवर असल्याने वारणा म्हणून हे धरण प्रसिध्द आहे. 1978 ला धरणाच्या बांधकामापासून सुरू झालेला फक्त मुख्य कालवाच पूर्ण आहे.त्याच्या गळतीने शेतकरी हैराण आहेत.२६ किलोमीटरवर येऊन मुख्य कालव्याचे रूपांतर डाव्या व उजव्या कालव्यात झाले आहे.धरणाच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पातून वीज निर्मिती केल्यानंतर बाहेर पडणार्या पाण्याचा सिचंना साठी वापर होतो.येथे 1998-99 पासून 8 मेगावॉट क्षमतेची दोन जनित्रे एकूण16 मेगावॉट वीजनिर्मिती करीत आहेत.चांदोली धरण हा पाण्याचा अमूल्य ठेवा आहे. नैसर्गिक देणगी लाभलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात अडीच हजाराहून अधिक मिलीमीटर पाऊस पडतो. धरणाच्या प्रवेशद्वारावर; तसेच माथ्यावर दक्षिण व उत्तरेला सुरक्षेसाठी दोन चौक्या आहेत.परवानगी घेऊनच धरण पाहण्यासाठी सोडले जाते. दुचाकी,चारचाकी घेऊन धरणाच्या सर्व भागात आरामदायी फिरता येते डोंगर, दर्या,प्रचंड पाणीसाठा, थंड हवा, शांत व नयनरम्य परिसर पाहून कोणालाही येथे मुक्काम जणू भुरळच पडते.उन्हाळ्याअ येथे येणार्या पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा आहे. वन विभागामार्फत पाणलोट क्षेत्रात चारही बाजूंनी पाणी असलेल्या टेकडीवर तंबू टाकण्यात येत. तेथे राहण्याची सोय जेवणाची सोय होती: येथून पुढे चांदोलीचा विकास खूप होणार आहे... मार्ग : कराड पासून 60 km वर आह